पर्यावरण आणि मानवी जीवन

पर्यावरण आणि मानवी जीवन 



          पृथ्वीवर सर्वात बुद्धिमान जर कोणी असेल तर तो म्हणजे मानव. त्यामुळे  त्याने आपल्या बुद्धीमतेचा वापर करूनं पर्यावारानाकडून जसा पाहिजे तसा आपला विकास साधवून घेतला. मात्र परतफेड करण्याचे साफ विसरला. एखाद्या व्यक्तीकडून  व समाजाकडून जेंव्हा आपण मदत घेतो तेंव्हा त्याच्या प्रती नेहमी कृतज्ञ राहतो, हा नियम पर्यावरणाशी मानवाने कधीही पाळला नाही. त्यामुळेच आज 'पर्यावरण वाचवा' यांसारखी वाक्ये कानी पडतात.सर्वप्रथम मी पर्यावरणाचा एक घटक आहे याचे भान प्रत्येकाने थावाने गरजेचे आहे.ज्याप्रकारे कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती  कुटुंबाचा एक घटक असल्याचे भान ठेऊन वागतो,त्यामुळेच  त्या कुटुंबात सुख, समृद्धी, आणि स्थिरता दिसून येते. कुटुंबातील एक जरी व्यक्ती बेजबाबदारपणे वागला तर संपूर्ण कुटुंबाला  त्याचे फल भोगावे लागते. पर्यावरणाचही  तसेच आहे.
           पर्यावरणाचे माझ्यावर कर्ज आहे आणि ते मला फेडायचे आहे हे हि ध्यानात असू द्यावे.पर्यावरणाचा ऱ्हास होण्यामागे वाढती लोकसंख्या हे ही  एक प्रमुख कारण आहे.  आपण आन्नाशिवाय एखादा दिवस, पाण्यावाचून एखादा तस जिवंत राहू शकतो, मात्र हवेतील ऑक्सिजन शिवाय क्षणभर सुद्धा जिवंत राहू शकत नाही. आणि याच   ऑक्सिजन निर्मितीचे सर्वात मोठे कार्य हे परिसरातील वृक्ष करीत असतात.वनस्पती स्वतः चे अन्न स्वतः तयार करतात आणि हवेतील कार्बन डायऑकसाइड म्हणजेच खराब हवा शोषून घेऊन उपयुक्त अशी शुद्ध हवा  हवेत सोडत असतात.
              आज जंगलतोड फार मोठ्या प्रमाणावर होताना दिसत आहे.जंगले वाचविण्यासाठी व लोकांमध्ये जागृती करण्यासाठी सुंदरलाल बहुगुणा यांनी 'चिपको आंदोलन' चालविले आणि त्यात यशस्वी सुद्धा झाले.वृक्षांचे महत्व अपरंपार आहे. हे आपले पूर्वज सुद्धा जाणून होते. संत तुकाराम महाराज याविषयी म्हणतात कि                                    " वृक्षवल्ली, आम्हा सोयरे वनचरे ,
                                           पक्षीही सुस्वरे आळविती "
खरेंच वृक्ष हे आपले म्सागे सोयरे, नातलग , मित्र,परिवारातीलच नव्हे का ?
                     नैसर्गिक साधनसंपत्ती मध्ये सौर ऊर्जा हि कधीही ना संपणारी संपत्ती आहे. भविष्यात सौर उर्जेच्या वापरत वाढ करणे म्हणजे एकप्रकारे पर्यावरणाला हातभार लावण्यासारखे आहे.पेट्रोल, डीझेल यांसारख्या इंधनाचा मर्यादित साठा भविष्यात संपण्याची श्याक्याता नाकारताच येत नाही. त्याचा जपून वापर करण्यातच शहाणपणा आहे. सोबतच अमर्यादित अशा सौर उर्जेचा इंधनासाठी पर्याय म्हणून वापर करण्यासाठी सुरुवात केल्यास भविष्यातील अनेक संकटापासून मुक्तता मिळू शकेल.अआज ज्या सौर उर्जेचा वापर नगण्य स्वरुपात आहे म्हणजेच पूर्णपणे वाया जात आहे. त्याचा अनेक माध्यमातून वापर करता येऊ शकतो आणि पर्यावरणाचा असमतोल थांबविता येऊ शकतो.
                        

Comments

Popular posts from this blog

लोकसंख्या, पर्यावरण आणि विकास

अंधश्रद्धा आणि समाज