पर्यावरणाप्रती संवेदनशील बना


पर्यावरणाप्रती संवेदनशील बना 






ग्लोबल वॉर्मिंग मध्ये होणारी वाढ हा सध्याचा गंभीर प्रश्न आहे तो प्रत्येकाच्या जीवनाशी निगडीत असून त्याचे दुष्परिणाम सर्वांनाच भोगावे लागतं आहेत. स्वतःच्या  जीवनशैलीत काही छोटे- छोटे बदल करून ग्लोबल वॉर्मिंग कमी करण्यात प्रत्येकजण खारीचा वाट नक्कीच उचलू शकतो. आज आपल्या सर्वांनाच जगातील विविध खाद्यपदार्थाची चव चाखायला खूप आवडत. त्या संदर्भात प्रयोग करायलाही आवडत. परंतु राजगिरा सारखा सकस नैसर्गिक व जैविक खाद्यपदार्थ उपलब्ध असताना परदेशातून खाद्य पदार्थ आयात कारण अनावश्यक वाटत. कारण एक तरी ते अधिक खर्चिक असतात. आणि  दुसर म्हणजे त्यामुळ कार्बन उत्सर्जनात भर पडते.
            नेहमी आयात अन्नधान्य ऐवजी स्थानिक पातळीवर तयार होणार्या खाद्य पदार्थांना प्राधान्य देतो.पण ते ताजे आणि दर्जेदार असायला हवेत.यातून स्थानिक शेतकरी आणि विक्रेते विशेषत: महिला विक्रेते सक्षम होतात असं मला वाटत. तुम्ही जेंव्हा बाजारात जल तेंव्हा भाज्या  आणि अन्य  सामानासाठी पिशवी घेऊन जा.हि पिशवी ओउन्हा पुन्हा वापरता यावी अशी असावी. थर्माकॉल, स्तेरोफोम आणि पेट बॉटल आणि वजनदार व कठीण व खूप पक्क्या पॅॅकेजिंगच्या वस्तू खरेदी करू नका. तुमच्याकडे पुनर्वापर ना होणार अनावश्यक साहित्य जमा झालेले असेल तर ते सार्वजनिक कचरा कुंडीत टाकू नका. ते सर्व समान महानगर पालिकेच्या घनकचरा संकलन करणाऱ्या कर्मचार्याकडे द्यावे.
             कार्बन असलेल्या वातावरणात आपल्याला रहाव लागत. त्याला घनकचरा हे एक कारण आहे. अन्न पदार्थ ते कपडे आणि इलेक्ट्रॉनिक ते इंधन या स्वरूपातल्या कचरा सर्वच ठिकाणी विपुल प्रमाणात दिसतो. आपण नेहमीच पुंर्वापाराविषयी बोलतो.पण त्याच मूळ एकाच वस्तू अधिक उपयोगर आणण्यात आहे. जुने कपडे , शूज, आणि विशिष्ठ विद्युत उपकरणाचे भाग हे कचर्याच्या ढीगामध्ये मिसळतात. जे भूमी आणि भूजल अशा दोन्हीच्या प्रदूषणाला कानिभूत ठरतात. त्यामुळेच वैयक्तिक रित्या मी कमीत कमी खरेदीचा नियम पाळतो. आणि तो सर्वांनी पाळायलाच हवा तरच आपण पर्यावरण सुरक्षित राखू आणि त्याच्या संवर्धनाचे कार्य करू.

Comments

Popular posts from this blog

पर्यावरण आणि मानवी जीवन

लोकसंख्या, पर्यावरण आणि विकास

अंधश्रद्धा आणि समाज