स्वातंत्र्याची ६८ वर्षे

                                                     स्वातंत्र्याची ६८ वर्षे 




            भारतातला स्वातंत्र्य मिळून ६८ वर्षे झाली. स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेक क्रांतिकारी, स्वातंत्र्यवीरांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. स्वराज्य मिळविण्यासाठी टिळक, गांधी , प्स्तेल, सुभाषचंद्र बोस या महापुरुषांच्या नेतृत्वाखाली अनेक जन स्वातंत्र्याच्या लढाईत धारातीर्थी पडले.स्वराज्याचं स्वप्न अखेर १५  ऑगस्ट १९४७ साली सत्यात उतरल.स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्येला पंडित नेहरूंनी दिलेल्या भाषणात भारताने स्वातंत्र्यासाठी केलेला प्रवास उलगडला.आणि त्याचबरोबर भारताने आपल स्वातंत्र्य परत मिळवल्याच जगात सांगितल.भारताला सर्वात मोठे लोकशाही राष्ट्र म्हणून ओळखले जाते.
              भारत ज्या वेगाने प्रगती करत आहे त्याच्या दुप्पट वेगाने समस्यांनी वेढलेला आहे. प्रश्न पडतो कि खरंच आपण स्वतंत्र आहोत का ? ब्रिटीश राजवटीतून आपण कधी मुक्त झालो.पण महागाई, दहशतवाद, भ्रष्टाचार, स्वैराचार यात मात्र अडकलो. आणि यातून दिवसेंदिवस बाहेर पडण कठीण होत चाललंय. परकीयांशी लढण सोप्प आहे पण स्वकियांशी तितकच अवघड.
               आपल्याला महान आणि तडफदार नेते, राजकारण्यांचा इतिहास आहे. पण खेड याचा वाटतो कि, या इतिहासाची पुनरावृत्ती होत नाहीये. आज आपल्या देशात भ्रष्टाचार इतका बोकाळला आहे कि, आणखी काही दिवसांनी तो एक शिष्टाचार होतो कि काय अशी भीती निर्माण झाली आहे. Stamp पेपर पासून ते चार घोटाळा यांसारख्या अनेक घोटाळ्यात माननीय मंत्री अडकलेले आहेत.गांधीजींच्या तत्वज्ञानाचा जगभरात आजही पुरस्कार केला जातो.पण आज त्याच गांधीजींच्या देशात त्यांच्याच तत्वावर आधारलेल भ्रष्टाचार विरोधी आंदोलन गुंडाळाव लागल. महागाई, भ्रष्टाचार, दहशतवाद यांची झाल बसणारा माणूस बोथट झाला आहे. किती आणि कोणाला प्रतिकार करणार म्हणून एकतरी सहन कारण नाहीतर विसरन असा पवित्र त्यांनी घेतला आहे.
                  आर्थिक महासत्तेची स्वप्न बघणाऱ्या भारतात दारिद्र्य रेषेखालील जनतेला अन्न, निवारा, या जीवनावश्यक गोष्टीची भ्रांत आहे.आज तिरंगा फडकवताना मानत येत कि खरंच भारतात शांतता आहे काय ?शेतकऱ्यांच्या आत्महत्या होणार्या कृषिप्रधान भारतात सुबत्ता आके काय ? आणखी ९ वर्षांनी आपण स्वातंत्र्याची ७५ री धुमधडाक्यात साजरी करू पण तेंव्हा  चित्र खरेच पालटले असेल अशी अशा व्यक्त करूया.

Comments

Popular posts from this blog

पर्यावरण आणि मानवी जीवन

लोकसंख्या, पर्यावरण आणि विकास

अंधश्रद्धा आणि समाज