पुतळे आणि विचार
पुतळे आणि विचार
त्रीपुरातल्या लोकांनी लेनिनवादी साम्यवादीपार्टीचा पराभव होताच तिथला लेनिनचा पुतळा पडून टाकला.या पाडकामामागे रशियातल्या काही घटनांचा संबंध आहे.रशियात १९८९ साली साम्यवादी राजवट संपली तेंव्हा लोकांनी केवळ लेनिनच नाहीतर अन्य काही साम्यवादी नेत्यांचे पुतळे पाडले होते. आता त्रिपुरात त्याचीच पुनरावृत्ती झाली आहे.असे पुतळे पडणे योग्य नाही आणि आपली ती परंपराही नाही. पण लेनिनने जो विचार सांगितला त्या विचाराने त्रीपुरातल्या गरीब लोकांचे प्रश्न सुटले नाहीत.म्हणून ते लेनिनचा पुतळा पडून आपला साम्यवादी विचारावरचा राग व्यक्त करीत होते.जगभरातच साम्यवादी विचार सरणी अपयशी ठरली आहे.
साम्यवादी विचार अपयशी ठरला असला तरीही त्याचा फार राग आला नसता पण या विचाराने अनेक भ्रामक कल्पना निर्माण केल्या आणि जगभरातल्या गरिबांना आपल्या तत्वज्ञानानेचांगले दिवस येतील असे आमिष सातत्याने दाखविले. प्रत्यक्षात साम्यवाद नावाची विचारसरणी गरिबांना न्यायही देत नाही आणि त्यांना समान अधिकारही देत नाही.असे लक्षात आले आहे. चीन आणि रशिया या दोन देशांना साम्यवादी विचारांची कशी आणि मथुरा अथवा मक्का आणि मदिना मानले जात होते. पण या दोन देशांनी ती साम्यवादी अर्थव्यवस्था टाकून दिली अंनि भांडवलशाही व्यवस्थेचा स्वीकार केला.या दोन देशांनीच साम्यवादाला सोडचिठ्ठी दिलीये असे म्हंटल्यावर जगभरातल्या काही देशातल्या साम्यवादी अर्थव्यवस्था संपल्या.
साम्यवादाचा असं पाडाव झाला असला तरीही आणि जगभरातल्या गरीबांचा या विचाराविषयी भ्रमनिरास झाला असतानाही भारतातले साम्यवादी नेते मात्र त्याच टाकाऊ आणि कालबाह्य अशास्त्रीय विचारांना चिकटून बसलेले आहेत. आणि सनातनी लोकांप्रमाणे त्याच साम्यवादी विचारांच्या पोथ्यांची पारायणे करीत आहेत.साम्यवादात अपेक्षित असलेली अनेक भाकिते चुकीची आणि गैरलागू ठरली आहेत. पण लोक त्यांनाच कुरवाळून बसले आहेत.साम्यवादाची तत्वे काही वेगळी असतात असे म्हणावे तर तसा अनुभवही येत नाही. डाव्या आघाडीने बंगालमध्ये ३५ वर्षे राज्य केले पण बंगालची गरिबी हटली नाही. उलट बंगाल हे देशातले एक गरीब राज्य आहे. मग ३५ वर्षे साम्यवादी राजवट असूनही जर राज्य गरीब राहत असेल तर असा साम्यवादी विचार फेकून दिलेला काय वाईट ?
Comments
Post a Comment