पर्यावरणाच्या समस्या आणि भविष्यातील धोके
पर्यावरणाच्या समस्या आणि भविष्यातील धोके
आपल्या पृथ्वीमातेला तिच्या लाडक्या बाळांच्या ( मानवाच्या ) नको त्या उद्यापने अनेक आरोग्यविषयक समस्यांनी ग्रासलेले आहे. जागतिक तापमानवाढ, आम्लयुक्त पाऊस, वायू प्रदूषण , नागरी अवस्था, कचरा समस्या, ओझोन वायूची घटती पातळी, जल प्रदूषण अशा एक ना अनेक व्याधींनी पृथ्वीच्या आयुष्याला साडेसाती लावली आहे.मागील काही दशकापासून मानवाकडून चाललेला पृथ्वीच शोषण आणि वातावरणाची अवनती ने आता धोक्याची पटली ओलांडली आहे.आपली स्वार्थी चंगळवादी कृष्णकृत्ये पृथ्वीच्या प्रकृती रक्षणाला अनुकुल नसल्याने , पूर भूकंप,सुनामी, वादळे, यासारख्या नैसर्गिक आपदांना वारंवार आपल्याला तोंड द्यावे लागतं आहे.वेगवेगळे निसर्गमित्र व संस्था पृथ्वीच्या या दुर्दशेबद्दल जगभरात लोकांना अवगत व शिक्षित करण्याचा आपापल्या परीने परायात्न करत आहेत.
पृथ्वीच्या आरोग्याच्या दृष्टीने व वातावरणासाठी चिंताजनक असलेले बरेच घटक आहेत. हवा, पाणी आणि मातीच प्रदूषणामुळे होणार नुकसान भरून निघण्यासाठी कित्येक वर्षे लागतात.कारखाने आणि मोटारीच्या इंजनाची धुराडी हि सगळ्यात जास्त विषारी वायूंचे स्रोत आहेत.याप्रमाणेच स्वच पिण्याचे पाणी एक असामान्य गोष्ट बनत चालली आहे.पाणी हि अपरिहार्य मानवी गरज आहे. साहजिकच समाजात पाण्यावरून युद्धे झाली आहेत.आणि पुढे देखील होण्याची शक्यता नाकारता येत नाही.हवामान बदल हा पर्यावरणात प्रदूषणामुळे होणाऱ्या विविध विध्वंसक बदलांचा परिणाम आहे. हवामान बदल गेल्या दशकात समोर आलेली आणखी एक पर्यावरणीय चिंता आहे.
याचबरोबर पर्यावरणात आढळणाऱ्या जैविक संसाधने, प्रामुख्याने जैविक इंधनाचा बेलगाम वापर व दुरुपयोग देखील पर्यावरणासंबंधी एक चिंताच आहे.आपल्या जंगलातली झाडे नवीन ऑक्सिजन तयार करतातच , पण याव्यतिरिक्त तापमान आणि पर्जन्यमान व्यवस्थापित करण्यात देखील मदत करतात.सध्या इमारतीसाठी लाकूड पुरवणाऱ्या वानाक्षेत्राने पृथ्वीचा ३०% भूभाग व्यापला आहे. वाढत्या तापमानवाढीमुळे होणारे हवामान बदल हे मानवाकडून होणार्या हरितगृह वायू उत्सर्जनाचे परिपाक आहेत.
कार्बन डाय ऑक्साईडचे वातावरणातले आणि पाण्यातले वाढते प्रमाण सातत्याने सर्व सजीव सृष्ठीसाठी धोकादायक होत चालले आहे.पृथ्वीवरील मोठ्या प्रमाणावरील सार्वजनिक अस्वच्छता व अनारोग्य हि देखील एक मानवी अस्तित्वासाठी चिंता करण्यासारखी गोष्ट आहे.आपले संपूर्ण असित्व व सुखसमृद्धी हि निसर्गाच्या कृपेवर अवलंबून आहे. या गोष्टीचे सदैव भान ठेऊन वरील पर्यावरणीय समस्या आणि भविष्यातील धोके ओळखून आपण आपली जीवनशैली बदलली पाहिजे.नाहीतर जन्माला येणाऱ्या पुढच्या पिढीसाठी पृथ्वी हि स्वर्गाचे द्वार ना होता नरकाचे द्वार ठरेल यात तिळमात्र शंका नाही.
आपल्या पृथ्वीमातेला तिच्या लाडक्या बाळांच्या ( मानवाच्या ) नको त्या उद्यापने अनेक आरोग्यविषयक समस्यांनी ग्रासलेले आहे. जागतिक तापमानवाढ, आम्लयुक्त पाऊस, वायू प्रदूषण , नागरी अवस्था, कचरा समस्या, ओझोन वायूची घटती पातळी, जल प्रदूषण अशा एक ना अनेक व्याधींनी पृथ्वीच्या आयुष्याला साडेसाती लावली आहे.मागील काही दशकापासून मानवाकडून चाललेला पृथ्वीच शोषण आणि वातावरणाची अवनती ने आता धोक्याची पटली ओलांडली आहे.आपली स्वार्थी चंगळवादी कृष्णकृत्ये पृथ्वीच्या प्रकृती रक्षणाला अनुकुल नसल्याने , पूर भूकंप,सुनामी, वादळे, यासारख्या नैसर्गिक आपदांना वारंवार आपल्याला तोंड द्यावे लागतं आहे.वेगवेगळे निसर्गमित्र व संस्था पृथ्वीच्या या दुर्दशेबद्दल जगभरात लोकांना अवगत व शिक्षित करण्याचा आपापल्या परीने परायात्न करत आहेत.
पृथ्वीच्या आरोग्याच्या दृष्टीने व वातावरणासाठी चिंताजनक असलेले बरेच घटक आहेत. हवा, पाणी आणि मातीच प्रदूषणामुळे होणार नुकसान भरून निघण्यासाठी कित्येक वर्षे लागतात.कारखाने आणि मोटारीच्या इंजनाची धुराडी हि सगळ्यात जास्त विषारी वायूंचे स्रोत आहेत.याप्रमाणेच स्वच पिण्याचे पाणी एक असामान्य गोष्ट बनत चालली आहे.पाणी हि अपरिहार्य मानवी गरज आहे. साहजिकच समाजात पाण्यावरून युद्धे झाली आहेत.आणि पुढे देखील होण्याची शक्यता नाकारता येत नाही.हवामान बदल हा पर्यावरणात प्रदूषणामुळे होणाऱ्या विविध विध्वंसक बदलांचा परिणाम आहे. हवामान बदल गेल्या दशकात समोर आलेली आणखी एक पर्यावरणीय चिंता आहे.
याचबरोबर पर्यावरणात आढळणाऱ्या जैविक संसाधने, प्रामुख्याने जैविक इंधनाचा बेलगाम वापर व दुरुपयोग देखील पर्यावरणासंबंधी एक चिंताच आहे.आपल्या जंगलातली झाडे नवीन ऑक्सिजन तयार करतातच , पण याव्यतिरिक्त तापमान आणि पर्जन्यमान व्यवस्थापित करण्यात देखील मदत करतात.सध्या इमारतीसाठी लाकूड पुरवणाऱ्या वानाक्षेत्राने पृथ्वीचा ३०% भूभाग व्यापला आहे. वाढत्या तापमानवाढीमुळे होणारे हवामान बदल हे मानवाकडून होणार्या हरितगृह वायू उत्सर्जनाचे परिपाक आहेत.
कार्बन डाय ऑक्साईडचे वातावरणातले आणि पाण्यातले वाढते प्रमाण सातत्याने सर्व सजीव सृष्ठीसाठी धोकादायक होत चालले आहे.पृथ्वीवरील मोठ्या प्रमाणावरील सार्वजनिक अस्वच्छता व अनारोग्य हि देखील एक मानवी अस्तित्वासाठी चिंता करण्यासारखी गोष्ट आहे.आपले संपूर्ण असित्व व सुखसमृद्धी हि निसर्गाच्या कृपेवर अवलंबून आहे. या गोष्टीचे सदैव भान ठेऊन वरील पर्यावरणीय समस्या आणि भविष्यातील धोके ओळखून आपण आपली जीवनशैली बदलली पाहिजे.नाहीतर जन्माला येणाऱ्या पुढच्या पिढीसाठी पृथ्वी हि स्वर्गाचे द्वार ना होता नरकाचे द्वार ठरेल यात तिळमात्र शंका नाही.
Comments
Post a Comment