चला परत लहान होऊयात
चला परत लहान होऊयात
" !! लहानपण देगा देवा ,
मुंगी साखरेचा रवा,
ऐरावत रत्न थोर,
त्यासी अंकुशाचा मार !!"
आई, बाबा होण हा निसर्गाने दिलेला सन्मान आहे. पण सध्याच्या धाक धकीच्या जीवनात पालक म्हणतात की मुलांना वेळ देता येत नाही त्यामुळे त्यांना समजून घ्यायला आपल्याकडे पुरेसा वेळ नाही. यामुळे मुले एकल कोंडी होतात असा समज झाला आहे. तास पाहायला गेल तर प्रत्येक घरात एक दोन लहान मुले हि असतातच,. पण जेंव्हा वेळ मिळतो तेंव्हा त्या मुलांचे पालक लहान होताना दिसतात. त्यामुळे त्यांच्यासाठी रोजच बालदिन असतो त्यांचे हसणे ,रडणे, मस्ती, खोडकरपण, रुसन , फुगण हे सगळे ते पालक त्यांच्यासोबत लहान होऊन त्याला समजून घेतात. मुलांना काय आवडत आणि काय आवडत नाही हे शोधन आवश्यक आहे.
एकविसाव्या शतकातील मुले हि खूप हुशार, चंचल आहेत. सर्व गोष्टीत परिपूर्ण आहेत. त्यामुळे त्यांना समजून घेण पण अवघड असत. त्यांचे प्रश्न असे असतात की त्यांचे उत्तर आपल्याकडे नसते. पण आपल्या मुलांबद्दल आपणच अभ्यास केला तर या सर्व गोष्टीचा मार्ग आपोआपच मोकळा होतो. आयुष्याचा आनंद घेण्याचा - मौजमस्ती करण्याचा हक्क या मुलांना पण आहे. हा हक्क मिळालेल्या आपल्या नशीबवान मुलांनी आपल्या आनंदात इतरानाही सहभागी करून घेण्याबाबतची जाणीव ठेवणे आवश्यक आहे.
पालकांनी हि जाणीव आपल्या मुलांच्या मनात रुजवली तर भारताचे भावी नागरिक सुज्ञ आणि समजूतदार बनतीलाच शिवाय कायमच वंचित आणि नकारात्मक जगणे वाट्याला आलेल्या एखाद्या दुर्दैवी बालकालाही आपल्या या प्रयत्नामुळे चांगले आयुष मिळू शकेल.आपण सर्वांनी हे सुजन पालक म्हणून स्वीकारलात तर ती पिढी नक्कीच सुसंस्कारित होईल.
मुला मुलीना सुरक्षित आणि प्रेमाच्या वातावरणात वाढवले गेले पाहिजे. मुले निरागास्च असतात. त्यांना त्यांच्या आयुष्य फुलवण्याची संधी मिळाली पाहिजे. फुलापाखारसारख बागडू द्यायला पाहिजे.कच्या मडक्याला जसा आकार देऊन तसे ते मडके घडत असते. तसेच मुलाना जसे त्यांचे पालक घडवतील तसे ते घडत जाणार. शेवटी चांगले- वाईट , योग्य- अयोग्य हे सांगायला तर पालक आहेतच.
" !! लहानपण देगा देवा ,
मुंगी साखरेचा रवा,
ऐरावत रत्न थोर,
त्यासी अंकुशाचा मार !!"
आई, बाबा होण हा निसर्गाने दिलेला सन्मान आहे. पण सध्याच्या धाक धकीच्या जीवनात पालक म्हणतात की मुलांना वेळ देता येत नाही त्यामुळे त्यांना समजून घ्यायला आपल्याकडे पुरेसा वेळ नाही. यामुळे मुले एकल कोंडी होतात असा समज झाला आहे. तास पाहायला गेल तर प्रत्येक घरात एक दोन लहान मुले हि असतातच,. पण जेंव्हा वेळ मिळतो तेंव्हा त्या मुलांचे पालक लहान होताना दिसतात. त्यामुळे त्यांच्यासाठी रोजच बालदिन असतो त्यांचे हसणे ,रडणे, मस्ती, खोडकरपण, रुसन , फुगण हे सगळे ते पालक त्यांच्यासोबत लहान होऊन त्याला समजून घेतात. मुलांना काय आवडत आणि काय आवडत नाही हे शोधन आवश्यक आहे.
एकविसाव्या शतकातील मुले हि खूप हुशार, चंचल आहेत. सर्व गोष्टीत परिपूर्ण आहेत. त्यामुळे त्यांना समजून घेण पण अवघड असत. त्यांचे प्रश्न असे असतात की त्यांचे उत्तर आपल्याकडे नसते. पण आपल्या मुलांबद्दल आपणच अभ्यास केला तर या सर्व गोष्टीचा मार्ग आपोआपच मोकळा होतो. आयुष्याचा आनंद घेण्याचा - मौजमस्ती करण्याचा हक्क या मुलांना पण आहे. हा हक्क मिळालेल्या आपल्या नशीबवान मुलांनी आपल्या आनंदात इतरानाही सहभागी करून घेण्याबाबतची जाणीव ठेवणे आवश्यक आहे.
पालकांनी हि जाणीव आपल्या मुलांच्या मनात रुजवली तर भारताचे भावी नागरिक सुज्ञ आणि समजूतदार बनतीलाच शिवाय कायमच वंचित आणि नकारात्मक जगणे वाट्याला आलेल्या एखाद्या दुर्दैवी बालकालाही आपल्या या प्रयत्नामुळे चांगले आयुष मिळू शकेल.आपण सर्वांनी हे सुजन पालक म्हणून स्वीकारलात तर ती पिढी नक्कीच सुसंस्कारित होईल.
मुला मुलीना सुरक्षित आणि प्रेमाच्या वातावरणात वाढवले गेले पाहिजे. मुले निरागास्च असतात. त्यांना त्यांच्या आयुष्य फुलवण्याची संधी मिळाली पाहिजे. फुलापाखारसारख बागडू द्यायला पाहिजे.कच्या मडक्याला जसा आकार देऊन तसे ते मडके घडत असते. तसेच मुलाना जसे त्यांचे पालक घडवतील तसे ते घडत जाणार. शेवटी चांगले- वाईट , योग्य- अयोग्य हे सांगायला तर पालक आहेतच.
Comments
Post a Comment