समतेचे प्रणेते डॉ. बाबासाहेब आंबेडकर

                                  समतेचे प्रणेते डॉ. बाबासाहेब आंबेडकर







             जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारत देशात आपण राहतो याचा प्रत्येक भारतीयाला अभिमान नक्कीच असेल.आपल्या अतुल धाडसाने व भारत देशाचे स्वातंत्र्य या एकमेव ध्येयांनी प्रेरित झालेल्या असंख्य देशभक्तांनी स्वतंत्र लढ्याचा इतिहास घडवला आहे. अखेर त्यांची लढाऊ वृत्ती व वीरश्रीयुक्त बलिदान व्यर्थ न जाता १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वतंत्र मिळाले. भारत देश सार्वभौम झाला. आपल्या खंडप्राय देशाला नियमांची चौकात आखणे तसेच त्याचे घटनेत रुपांतर करणे हे जिकीरीचे व व्यापक काम त्यावेळेस क्रमप्राप्तच होते. एवढे मोठे काम हे एकट्याच्या आवाक्यातील नसल्याने भारत देशाची घटना बनविण्यासाठी एक समिती बनविण्यात आली.
            त्या समितीत त्या काळातील नावाजलेल्या व्यक्तींचा अंतर्भाव होतो. कायद्याचा सखोल अभ्यास व कायद्यातील अत्युच्च पदवी असल्यामुळे साहजिकच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा घटना बनविण्यात सिंहाचा वाटा होता.  डॉ. बाबासाहेब आंबेडकर  हे समानतेचे कट्टर सुधारक होते. त्यांनी धर्म  सुधारणा सुधारणा करण्याचा प्रयत्न केला. उच्च-नीच हा भेदभाव त्यांना मान्य नव्हता.स्वातंत्र्यापूर्वी भारतातील मागासवर्गीय समाजाची म्हणजेच ब्राम्हण, क्षत्रिय, वैश्य व शुद्र या चातुर्वर्ण व्यवस्थे अंतर्गत समाजातील चतुर वर्णाची म्हणजेच शुद्र तसेच दली म्हणून हेटाळणी केली जायची.अशा वर्गाची परिस्थिती फारच बिकट भोती.या समाजघटकांना मागासवर्गीय संबोधले  जावे अशी त्यांची विचारसरणी होती. समाजातील या दुर्लक्षित घटकावर होणारे अत्याचार बघून त्यांना चीड येत असे. त्यांनी " मुकाभारत", " बहिष्कृत भारत ," जनता ", आणि "प्रबुद्ध भारत ", ही वर्तमानपत्रे  सुरु केली. समाजातील शुद्र व दलित वर्णातील लोकांवरील होणार्या अत्याचाराला वाचा फोडली. स्पृश अस्पृश्यामधील दरी मिटविण्याकडे त्यांचा कल होता.सन्मान, मानवी हक्क त्याचप्रमाणे आत्मविश्वास या त्रिसूत्री धोरणाचा त्यांनी अवलंब केला व या समाजाला मुख्य सामाजिक प्रवाहात अंतर्भूत करण्याची मानसिकता त्यांच्यात निर्माण व्हावी म्हणून प्रयत्न केले.त्यांना अस्पृशांना सन्मानाने जगता यावे म्हणून त्यांनी मंदिर प्रवेश तसेच महाड येथील " चवदार तळे " इत्यादी सत्याग्रह करून मागासवर्गीयातील आत्मविश्वास वाढविला.
            समाज व्यवस्थेतील या मागास वर्गीय म्हणून दुर्लक्षित घटकाला समाजाच्या मुख्य प्रवाहात स्थान मिळावे म्हणून त्यांनी अतोनात श्रम घेतले. या समाजाची पाठराखण करताना त्यांनी या समाजाला प्रथम शिक्षणाकडे लक्ष देण्याचे आव्हान केले. प्रचंड वाचन केल्यामुळे आपोआपच त्यांचे मनन, चिंतनयात सुधारणा झाली. भरपूर अभ्यास करून पदव्या घेतल्यामुळे व देशातील तसेच परदेशातील विविध स्थरातील लोकांशी संवाद साधल्यामुळे शिक्षणाला तारानोपाय्ब नाही याची खात्री त्यांना पटली.म्हणूनच त्यांनी या समाज घटकाला असे आव्हान केले कि प्रथम शिक्षण घ्या.शिक्षण घेतले तरच समाजात उथळ माथ्याने वावरता येयील. असा विचार मनात असतानाच त्यांना ते प्रत्यक्षात आणण्यासाठी संधी मिळाली व त्या संधीचे त्यांनी सोने करून तमाम मागास वर्गीय घटकांना समाजातील मुख्य प्रवाहात सामील होण्याची संधी दिली. 
                   भारतासारख्या खंडप्राय देशाला कायद्याच्या चौकटीत बसवून घटना बनविणे हे खरोखरच एक मोठे आव्हान होते. एवढ्या मोठ्या देशाची घटना बनविणे हे नक्कीच सोपे नव्हते. नेमलेल्या समितीमध्ये आंबेडकरांनी आपले सर्व ज्ञान पणाला लाऊन घटनेला मूर्त रुप दिले. घटना सर्वसामान्यांना कळावी व तिचे मनापासून पालन करावे यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा कटाक्ष होता. पूर्वी परकोटीची हीन प्रकारची कोणतीही कामे मागासवर्गीय लोकांकडून करून घेब्ण्यात उच्च वर्गीय लोक आपला अधिकार व हक्क मानत असत पण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेत तरतूद करून समाजातील उच्च - नीच तसेच स्पृश्य - अस्पृश्य यामधील दरी मिटवून टाकली.


Comments

Popular posts from this blog

पर्यावरण आणि मानवी जीवन

लोकसंख्या, पर्यावरण आणि विकास

अंधश्रद्धा आणि समाज