ग्रामीण दुष्काळ व शहरी झगमगाट
ग्रामीण दुष्काळ व शहरी झगमगाट
वर्षामागून वर्षे दुष्काळाची येत आहेत. कमी पावसामुळे निसर्गचक्राच बदलत आहे. विकसित देश भौतिक प्रगतीच्या पाठीमागे लागले आहेत. त्यामुळे पर्यावरणाचे किती नुकसान होत आहे याच्याशी त्यांना घेण - देन नाही.त्यामुळे ग्लोबल वार्मिंग व त्यामुळे निसर्गचक्र असंतुलीत झाले आहे. दुष्काळाचे दृष्ट चक्र सुरु झाले आहे. त्यात प्रामुख्याने ग्रामीन भाग जास्त प्रभावित झाला आहे.
सध्या आपण अनुभवतो आहोत पाण्याचा ज्वलंत व भीषण प्रश्न ! वर्तमानपत्रात रकानेच्या रकाने भरून गावागावाच्या आर्त कहाण्या व मन हेलाऊन सोडणारे फोटो. हंडाभर पाण्यासाठी बापड्यांना करावी लागणारी वनवन. टँँकराची वाट पाहत बसाव कामधंदा सोडून.कारण आता टँँकर येऊन गेला कि पुन्हा कधी येयील याचा भरवसा नाही.
गाईगुरे छावणीत आणि तिथेही राजकारण. घरातील एक माणूस छावणीवर सर्व गैंरसोयीसह. जीवाच्या आकांताने जीव जगविणे हा एक कलमी कार्यक्रम ग्रामीण भागात चालू असतो. सततच्या नापिकीमुळे, कर्जबाजारीपणामुळे शेतकरी मरणाला कवटाळतात उदास खेडे पाहून मन उद्विग्न होते. लोक घरे दारे आपल गाव सोडून पोटापाण्यासाठी शहराकडे धाव घेतात. परंतु तिथेही त्यांना अनंत आडचनीना तोंड द्यावे लागते. मुलाबलाचे हाल होतात. अपमानास्पद जीवन वाट्याला येते. शहरी भागातील दृश्य थोडे वेगळे नव्हे पुर्ण वेगळे दिसते.
राजकारणी जमात आम्ही दुष्काळी जनतेसाठी हे केले ते केले सांगत स्वतःच्या पाठीवर थाप मारण्यात दंग .सरकारच्या नावाखाली मंत्रिमंडळ कागदावर आकडे सजविण्यात दंग. वेळ मिळताच सेल्फी काढण्यात ढंग, फोतोसाठीच दौरे जणू. शहरात वीजकपात कमी खेड्यात भारनियमन १२ - १२ तास. वीज नाही विजेवर चालणारी सर्व उपकरणे बंद व त्यामुळे होणार्या गैरसोयी हजार. मोठ्या मोठ्या शहरात भव्य दिव्या कार्यक्रम चालू असतात. पैसा फेकून सुखं विकत घेतली जातात. एकदा टाॅॅयलेट वापरले कि 5 लिटर पाणी ड्रेनेमध्ये . बंगल्यासमोरील हिरवळीला पाणी. गाड्या धुण्यासाठी पाणी. टब बाथ, स्वतःचा स्विमिंग टँँक , शावर, पालटू कुत्र्याला अंघोळ. घरात गाडी ए.सी लाईट गिली तर ईनव्हटर आहेच. मग गर्मीन भागातील लोकांचा दोष काय ?ते ग्रामीण भागात जन्मले म्हणून. शहरातील झगमगाट पाहून असेच वाटते कि आपण दुसऱ्या दुनियेत आलो आहोत. हे चित्र बदलू शकते जर सत्ताधारी राजकारण्यांची मानसिकता बदलाली तर. शेतकऱ्यांना शेतीला पाणी, मालाला योग्य भाव , शेती विषयक प्रगत तंत्रज्ञान, मार्गदर्शन , सन्मान. शहरात पैसा असेल तर सर्व मिळते फक्त अन्न सोडून ! अन्न शहरात तयार होत नाही व झगमगाटाने पोट भारत नाही !!!
वर्षामागून वर्षे दुष्काळाची येत आहेत. कमी पावसामुळे निसर्गचक्राच बदलत आहे. विकसित देश भौतिक प्रगतीच्या पाठीमागे लागले आहेत. त्यामुळे पर्यावरणाचे किती नुकसान होत आहे याच्याशी त्यांना घेण - देन नाही.त्यामुळे ग्लोबल वार्मिंग व त्यामुळे निसर्गचक्र असंतुलीत झाले आहे. दुष्काळाचे दृष्ट चक्र सुरु झाले आहे. त्यात प्रामुख्याने ग्रामीन भाग जास्त प्रभावित झाला आहे.
सध्या आपण अनुभवतो आहोत पाण्याचा ज्वलंत व भीषण प्रश्न ! वर्तमानपत्रात रकानेच्या रकाने भरून गावागावाच्या आर्त कहाण्या व मन हेलाऊन सोडणारे फोटो. हंडाभर पाण्यासाठी बापड्यांना करावी लागणारी वनवन. टँँकराची वाट पाहत बसाव कामधंदा सोडून.कारण आता टँँकर येऊन गेला कि पुन्हा कधी येयील याचा भरवसा नाही.
गाईगुरे छावणीत आणि तिथेही राजकारण. घरातील एक माणूस छावणीवर सर्व गैंरसोयीसह. जीवाच्या आकांताने जीव जगविणे हा एक कलमी कार्यक्रम ग्रामीण भागात चालू असतो. सततच्या नापिकीमुळे, कर्जबाजारीपणामुळे शेतकरी मरणाला कवटाळतात उदास खेडे पाहून मन उद्विग्न होते. लोक घरे दारे आपल गाव सोडून पोटापाण्यासाठी शहराकडे धाव घेतात. परंतु तिथेही त्यांना अनंत आडचनीना तोंड द्यावे लागते. मुलाबलाचे हाल होतात. अपमानास्पद जीवन वाट्याला येते. शहरी भागातील दृश्य थोडे वेगळे नव्हे पुर्ण वेगळे दिसते.
राजकारणी जमात आम्ही दुष्काळी जनतेसाठी हे केले ते केले सांगत स्वतःच्या पाठीवर थाप मारण्यात दंग .सरकारच्या नावाखाली मंत्रिमंडळ कागदावर आकडे सजविण्यात दंग. वेळ मिळताच सेल्फी काढण्यात ढंग, फोतोसाठीच दौरे जणू. शहरात वीजकपात कमी खेड्यात भारनियमन १२ - १२ तास. वीज नाही विजेवर चालणारी सर्व उपकरणे बंद व त्यामुळे होणार्या गैरसोयी हजार. मोठ्या मोठ्या शहरात भव्य दिव्या कार्यक्रम चालू असतात. पैसा फेकून सुखं विकत घेतली जातात. एकदा टाॅॅयलेट वापरले कि 5 लिटर पाणी ड्रेनेमध्ये . बंगल्यासमोरील हिरवळीला पाणी. गाड्या धुण्यासाठी पाणी. टब बाथ, स्वतःचा स्विमिंग टँँक , शावर, पालटू कुत्र्याला अंघोळ. घरात गाडी ए.सी लाईट गिली तर ईनव्हटर आहेच. मग गर्मीन भागातील लोकांचा दोष काय ?ते ग्रामीण भागात जन्मले म्हणून. शहरातील झगमगाट पाहून असेच वाटते कि आपण दुसऱ्या दुनियेत आलो आहोत. हे चित्र बदलू शकते जर सत्ताधारी राजकारण्यांची मानसिकता बदलाली तर. शेतकऱ्यांना शेतीला पाणी, मालाला योग्य भाव , शेती विषयक प्रगत तंत्रज्ञान, मार्गदर्शन , सन्मान. शहरात पैसा असेल तर सर्व मिळते फक्त अन्न सोडून ! अन्न शहरात तयार होत नाही व झगमगाटाने पोट भारत नाही !!!
Comments
Post a Comment