बालमजुरी कधी संपेल

                                                           बालमजुरी कधी संपेल







              बालपण हि प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातील एक महत्वाचा टप्पा आहे. परंतु सर्वांचेच बालपण सुखात किंवा     मजेत जातात असे नाही. संत तुकाराम महारा यांनी बालपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा. असे म्हंटले आहे. पण समाजात वावरताना जे चित्र नजरेस पडते ते फारच भयानक आहे. सकाळी सूर्यकिरण धर्तीवर पडत ही नाही किं घराबाहेर एक चीराकणारा आवाज कानावर पडतो. त्या आवाजानेच जाग येते, म्हंटले तरी काही वावगे नाही. " ताई , शिळ काही असेल तर वाढ" असे ओरडणारे पोर त्याच बालपण काय म्हणत असेल. आपल्या पोटाचा प्रश्न सोडविण्यासाठी हे पोर दारोदारी भिक मागत फिरत असते आणि मिळालेली भिक आपल्या कुटुंबासह वाटून खातात.
               सूर्य डोक्यावर चढायला लागला कि ही पोरं उकिरडे शोधात फितात.मिळेल टी वस्तू आपल्या थैलीमध्ये भारतात.आणि सर्व वस्तू नेवून भंगारवाल्यांना विकून मिळेल त्या पैशात काही खरेदी करून खातात. त्यांना बालमजुरी म्हणावे का ? हा त्यांच्या पोटाचा प्रश्न असतो ज्याची सोडवणूक त्यांना स्वतःच करावी लागते. शिक्षण नावाची वस्तू तर त्यांच्यापासून कोसो दूर असते. शाळा म्हणजे काय हे त्या मुलालाच काय पण त्याच्या घरातील कोणालाच त्याची कल्पना नसते. शाळेत अनुपस्थित असणाऱ्या मुलाच्या घरी शिक्षक जेंव्हा करणे समजून घेण्यासाठी भेट देतात तेंव्हा पालकांचे उतर हे वेगळेच असते. शेताकडे बघायला कोणीच नाही आंनी मजुराला द्यायला पैसे नाहीत त्यामुळे याला सोबत घेऊन जातो. अशी उत्तरे सतत. मिळतात.
              एखाद्या देवाला रक्कम दान केल्याने खरंच पुण्य मिळते कि अशा सेवाभावी संस्थेला मदत केल्याने पुण्य मिळते याचा विचार करण्याची आज खरी वेळ आहे. देवाच्या   नावाने संपूर्ण गावाला  भंडारा खाऊ घालण्यापेक्षा भुकेल्या व्यक्तींना जेवण घातल्यानंतर जे समाधान मिळते कदाचित तर ते लाख रु दान केल्यानंतर सुद्धा मिळत नाही. वीटभट्टीवर व इतरत्र काम करणारे चौदा वर्षाखालील मुले बालकामगार म्हणून आपणास ठळकपणे दिसून येतात मात्र अशी बरीच मुले आहेत जे कि अप्रत्यक्षरीत्या बालकामगारच नव्हेट का ? अशा बालकामगार मजुरांची संख्या वाढत आहे हे कसे संपवता येयील याचा विचार समाजातील सर्व घटकांनी करणे गरजेचे आहे. बालमजुरी किंवा बालकामगार आणि शाळाबाह्य मुले हा कधीच ना संपणारा विषय आहे. तसेच हि समस्या फक्त भारतातच नव्हे तर जगाला भेडसावणारी समस्या आहे. 

Comments

Popular posts from this blog

पर्यावरण आणि मानवी जीवन

लोकसंख्या, पर्यावरण आणि विकास

अंधश्रद्धा आणि समाज