माणुसकीचे दर्शन
माणुसकीचे दर्शन
माणुसकी काय असते आणि ती कशी असावी हे माजी आमदार दिलीप माने यांनी दाखवून दिले. २८ एप्रिल रोजीची हि घटना. माजी आमदार दिलीप माने हे मोहोळ तालुक्यातील कामती येथे लग्न समारंभासाठी येत असताना कामतीजवळ कार आणि मोटारसायकल यांचा अपघात झाला. या अपघातात एक जण जागीच ठार तर एकजण गंभीर जखमी झाला होता. त्यावेळी माजी आमदार दिलीप माने हे जात होते आणि त्यांनी क्षणाचाही विचार न करता आपल्या गाडीतून जखमीला कांमतीच्या प्राथमिक रुग्णालयात नेले. परंतु तेथे त्यावेळी डॉक्टर उपलब्ध नव्हते.
यांनतर त्यांनी त्या जखमी ला सोलापुरा येथील सर्वोपचार रुग्णालयात नेले . आणि आपले पुढील सर्व कार्यक्रम रद्द केले. व माणुसकी काय व कशी असावी हे दाखवून दिले. आताच्या परिस्थितीला अपघात हि एक सामान्य बाबच झाली आहे. त्याला अनेक वेगवेगळ्या बाबी कारणीभूत आहेत. रोज कोठेतरी वेगवेगळे अपघात झाल्याचे वृत्त आपणास वृत्तपत्रातून वाचावयास मिळते. हे काही नवे नाही. परंतु अनेकदा रस्त्यावर एखादा अपघात घडला असला आणि तो अपघातग्रस्त व्यक्ती कितीही जखमी असला तरी काही वेळेला लोक त्याच्याकडे दुर्लक्ष करतात आणि पुढे निघून जातात. जर त्या अपघातग्रस्ताला मदत केली तर पोलीसआपणास अनेक वेगवेगळ्या प्रकारची विचारपूस करतील आणि वेळोवेळी आपणास पोलीस स्टेशन मध्ये हजार राहण्यास सांगतील या भीतीने काही वेळा त्या अपघात ग्रस्त व्यक्तीला मदत केली जात नाही.
परंतु माजी आमदार दिलीप माने यांनी या सर्व गोष्टीना बाजूला ठेऊन त्या अपघातग्रस्त व्यक्तीला आपल्या स्वतच्या गाडीतून रुग्णालयात हजर करून लोकांनी माणुसकी सुधारण्यावर भर द्यावा असे कार्य केले अहे. एखाद्या वेळो अपघात घडला असल्यास त्याला मदत मिळणे फार गरजेचे असते. आणि ती मदत कोणीही करू शकतो मग तो एक सामान्य माणूस असो वा कोणता मोठा राजकीय पुढारी. दिलीप माने हे जरी राजकीय व्यक्तिमत असणारी व्यक्ती असेल तरी ते पहिले माणूस आहेत आणि मग ते राजकीय नेते आहेत हे त्यांनी आपल्या वर्तणुकीतून दाखवून दिले. काही वेळा मदत न मिळाल्याने व्यक्ती दगावतात पण त्यांना अशीच मदत मिळाली तर त्या अपघातग्रस्त व्यक्तींना वाचवण्यात यश येऊ शते.
माणुसकी काय असते आणि ती कशी असावी हे माजी आमदार दिलीप माने यांनी दाखवून दिले. २८ एप्रिल रोजीची हि घटना. माजी आमदार दिलीप माने हे मोहोळ तालुक्यातील कामती येथे लग्न समारंभासाठी येत असताना कामतीजवळ कार आणि मोटारसायकल यांचा अपघात झाला. या अपघातात एक जण जागीच ठार तर एकजण गंभीर जखमी झाला होता. त्यावेळी माजी आमदार दिलीप माने हे जात होते आणि त्यांनी क्षणाचाही विचार न करता आपल्या गाडीतून जखमीला कांमतीच्या प्राथमिक रुग्णालयात नेले. परंतु तेथे त्यावेळी डॉक्टर उपलब्ध नव्हते.
यांनतर त्यांनी त्या जखमी ला सोलापुरा येथील सर्वोपचार रुग्णालयात नेले . आणि आपले पुढील सर्व कार्यक्रम रद्द केले. व माणुसकी काय व कशी असावी हे दाखवून दिले. आताच्या परिस्थितीला अपघात हि एक सामान्य बाबच झाली आहे. त्याला अनेक वेगवेगळ्या बाबी कारणीभूत आहेत. रोज कोठेतरी वेगवेगळे अपघात झाल्याचे वृत्त आपणास वृत्तपत्रातून वाचावयास मिळते. हे काही नवे नाही. परंतु अनेकदा रस्त्यावर एखादा अपघात घडला असला आणि तो अपघातग्रस्त व्यक्ती कितीही जखमी असला तरी काही वेळेला लोक त्याच्याकडे दुर्लक्ष करतात आणि पुढे निघून जातात. जर त्या अपघातग्रस्ताला मदत केली तर पोलीसआपणास अनेक वेगवेगळ्या प्रकारची विचारपूस करतील आणि वेळोवेळी आपणास पोलीस स्टेशन मध्ये हजार राहण्यास सांगतील या भीतीने काही वेळा त्या अपघात ग्रस्त व्यक्तीला मदत केली जात नाही.
परंतु माजी आमदार दिलीप माने यांनी या सर्व गोष्टीना बाजूला ठेऊन त्या अपघातग्रस्त व्यक्तीला आपल्या स्वतच्या गाडीतून रुग्णालयात हजर करून लोकांनी माणुसकी सुधारण्यावर भर द्यावा असे कार्य केले अहे. एखाद्या वेळो अपघात घडला असल्यास त्याला मदत मिळणे फार गरजेचे असते. आणि ती मदत कोणीही करू शकतो मग तो एक सामान्य माणूस असो वा कोणता मोठा राजकीय पुढारी. दिलीप माने हे जरी राजकीय व्यक्तिमत असणारी व्यक्ती असेल तरी ते पहिले माणूस आहेत आणि मग ते राजकीय नेते आहेत हे त्यांनी आपल्या वर्तणुकीतून दाखवून दिले. काही वेळा मदत न मिळाल्याने व्यक्ती दगावतात पण त्यांना अशीच मदत मिळाली तर त्या अपघातग्रस्त व्यक्तींना वाचवण्यात यश येऊ शते.
Comments
Post a Comment