Posts

माणुसकीचे दर्शन

Image
माणुसकीचे  दर्शन                माणुसकी काय  असते आणि ती कशी असावी हे माजी आमदार दिलीप माने यांनी दाखवून दिले. २८ एप्रिल रोजीची हि घटना. माजी आमदार दिलीप माने हे मोहोळ तालुक्यातील कामती येथे लग्न समारंभासाठी येत असताना कामतीजवळ कार आणि मोटारसायकल यांचा अपघात झाला. या अपघातात एक जण जागीच ठार तर एकजण गंभीर जखमी झाला होता. त्यावेळी  माजी आमदार दिलीप माने हे जात होते आणि त्यांनी क्षणाचाही विचार न करता आपल्या गाडीतून जखमीला कांमतीच्या प्राथमिक रुग्णालयात नेले. परंतु तेथे त्यावेळी   डॉक्टर उपलब्ध नव्हते.          यांनतर त्यांनी त्या जखमी ला सोलापुरा येथील सर्वोपचार रुग्णालयात नेले . आणि आपले पुढील सर्व कार्यक्रम रद्द केले. व माणुसकी काय  व कशी असावी हे दाखवून दिले. आताच्या परिस्थितीला अपघात हि एक सामान्य बाबच झाली आहे. त्याला अनेक वेगवेगळ्या बाबी कारणीभूत आहेत. रोज कोठेतरी वेगवेगळे अपघात झाल्याचे वृत्त आपणास वृत्तपत्रातून वाचावयास मिळते. हे काही नवे नाही.  परंतु अनेकदा रस्त्यावर एखा...

बालमजुरी कधी संपेल

Image
                                                           बालमजुरी कधी संपेल               बालपण हि प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातील एक महत्वाचा टप्पा आहे. परंतु सर्वांचेच बालपण सुखात किंवा     मजेत जातात असे नाही. संत तुकाराम महारा यांनी बालपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा. असे म्हंटले आहे. पण समाजात वावरताना जे चित्र नजरेस पडते ते फारच भयानक आहे. सकाळी सूर्यकिरण धर्तीवर पडत ही नाही किं घराबाहेर एक चीराकणारा आवाज कानावर पडतो. त्या आवाजानेच जाग येते, म्हंटले तरी काही वावगे नाही. " ताई , शिळ काही असेल तर वाढ" असे ओरडणारे पोर त्याच बालपण काय म्हणत असेल. आपल्या पोटाचा प्रश्न सोडविण्यासाठी हे पोर दारोदारी भिक मागत फिरत असते आणि मिळालेली भिक आपल्या कुटुंबासह वाटून खातात.                सूर्य डोक्यावर चढायला लागला कि ही पोरं उकिरडे शोधात फितात.मि...

ग्रामीण दुष्काळ व शहरी झगमगाट

Image
                                           ग्रामीण दुष्काळ व शहरी झगमगाट           वर्षामागून वर्षे दुष्काळाची येत आहेत. कमी पावसामुळे निसर्गचक्राच बदलत आहे. विकसित देश भौतिक प्रगतीच्या पाठीमागे लागले आहेत. त्यामुळे पर्यावरणाचे किती नुकसान होत आहे याच्याशी त्यांना घेण - देन नाही.त्यामुळे ग्लोबल वार्मिंग व त्यामुळे निसर्गचक्र असंतुलीत झाले आहे. दुष्काळाचे दृष्ट चक्र सुरु झाले आहे. त्यात प्रामुख्याने ग्रामीन भाग जास्त प्रभावित झाला आहे.             सध्या आपण अनुभवतो आहोत पाण्याचा ज्वलंत व भीषण प्रश्न ! वर्तमानपत्रात रकानेच्या रकाने भरून गावागावाच्या आर्त कहाण्या व मन हेलाऊन सोडणारे फोटो. हंडाभर पाण्यासाठी बापड्यांना करावी लागणारी वनवन. टँँकराची  वाट पाहत बसाव कामधंदा सोडून.कारण आता  टँँकर येऊन गेला कि पुन्हा कधी येयील याचा भरवसा नाही.            गाईगुरे छावणीत आणि ...

समतेचे प्रणेते डॉ. बाबासाहेब आंबेडकर

Image
                                  समतेचे प्रणेते डॉ. बाबासाहेब आंबेडकर              जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारत देशात आपण राहतो याचा प्रत्येक भारतीयाला अभिमान नक्कीच असेल.आपल्या अतुल धाडसाने व भारत देशाचे स्वातंत्र्य या एकमेव ध्येयांनी प्रेरित झालेल्या असंख्य देशभक्तांनी स्वतंत्र लढ्याचा इतिहास घडवला आहे. अखेर त्यांची लढाऊ वृत्ती व वीरश्रीयुक्त बलिदान व्यर्थ न जाता १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वतंत्र मिळाले. भारत देश सार्वभौम झाला. आपल्या खंडप्राय देशाला नियमांची चौकात आखणे तसेच त्याचे घटनेत रुपांतर करणे हे जिकीरीचे व व्यापक काम त्यावेळेस क्रमप्राप्तच होते. एवढे मोठे काम हे एकट्याच्या आवाक्यातील नसल्याने भारत देशाची घटना बनविण्यासाठी एक समिती बनविण्यात आली.             त्या समितीत त्या काळातील नावाजलेल्या व्यक्तींचा अंतर्भाव होतो. कायद्याचा सखोल अभ्यास व कायद्यातील अत्युच्च पदवी असल्यामुळे साहजिकच डॉ. बाबासाहेब आं...

विकासदर सुधारला पण ....

Image
                                                 विकासदर सुधारला पण ....                 नुकत्याच संपलेल्या तिमाहीत  देशाचा विकास वेग   ७.२  टक्के असल्याचे जाहीर झाले. या दरामुळे सरकार आणि सरकारच्या समर्थकात  आनंद व्यक्त केला जात आहे. कारण गेल्या वर्षी हा विकास्वेग ५.७ टक्के एवढा कमी झाला होता.तेंव्हा सरकारवर  विरोधकांनी टीका करायला सुरुवात केली होती. हि टीका एवढी तीव्र होती कि, राहुल गांधी यांनी आता अर्थव्यवस्थेचा कडेलोट होणार असल्याने लोकांनी बांधून तयार राहावे असे आव्हान केले होते. विकास वेग कमी झाल्याने आता रोजगार कमी निर्माण होणार. आंनी तरुणांमधील बेकारी वाढत जाणार.असे म्हंटले जायला लागलेले होते. ज्यांना अर्थव्यवस्थेतील काही काळते आणि ज्यांना काही काळात नाही त्या सर्वांचेच आता रोजगार निर्मितीचे काय ? असा सवाल करायला सुरुवात केली होती.             ...

पुतळे आणि विचार

Image
                                                                                                        पुतळे आणि विचार                   त्रीपुरातल्या लोकांनी लेनिनवादी साम्यवादीपार्टीचा पराभव होताच तिथला लेनिनचा पुतळा पडून टाकला.या पाडकामामागे रशियातल्या काही घटनांचा संबंध आहे.रशियात १९८९ साली साम्यवादी राजवट संपली तेंव्हा लोकांनी केवळ लेनिनच नाहीतर अन्य काही साम्यवादी नेत्यांचे पुतळे पाडले होते. आता त्रिपुरात त्याचीच पुनरावृत्ती झाली आहे.असे पुतळे पडणे योग्य नाही आणि आपली ती परंपराही नाही. पण लेनिनने जो विचार सांगितला त्या विचाराने त्रीपुरातल्या गरीब लोकांचे प्रश्न सुटले नाहीत.म्हणून ते लेनिनचा पुतळा पडून आपला साम्यवादी विचारावरचा राग व्यक्त करीत होते.जगभरातच साम्यव...

मरणाचा अधिकार

Image
                                                       मरणाचा अधिकार                अनेक लोकांचे म्हातारपण फारच वेदानादाई असते. काही लोक या वयात असाध्य रोगांनी पछाडलेले आणि मरणप्राय वेदनांनी व्याकूळ झाले की देवाची प्रार्थना करतात. देवा यातून सोडव म्हणून याचना करायला लागतात. पण देवाला त्यांची दया येत नाही.अशा लोकांची देवाला दया येत नाही आणि त्यांची सेवा करणारे आप्त त्रासून जातात. देवाने त्यांची सुटका करावी अशी ते मागणी करायला लागतात. आता त्यांची प्रार्थना न्यायालयाने ऐकली आहे. ज्याचे जगणे असह्य झाले आहे त्याला या जगण्याच्या यातानातून मुक्त करण्यास सर्वोच्च न्यायालयाने सशर्त मान्यता दिली आहे. अर्थात न्यायालयाने याबाबत काही मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. आणि सरकारने यावर कायदा करावा अशी न्यायालयाची सूचना आहे. तो कायदा मार्गदर्शक सूचनांच्या अनुरोधाने तयार केला जाईल.           ...