बालमजुरी कधी संपेल

बालमजुरी कधी संपेल बालपण हि प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातील एक महत्वाचा टप्पा आहे. परंतु सर्वांचेच बालपण सुखात किंवा मजेत जातात असे नाही. संत तुकाराम महारा यांनी बालपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा. असे म्हंटले आहे. पण समाजात वावरताना जे चित्र नजरेस पडते ते फारच भयानक आहे. सकाळी सूर्यकिरण धर्तीवर पडत ही नाही किं घराबाहेर एक चीराकणारा आवाज कानावर पडतो. त्या आवाजानेच जाग येते, म्हंटले तरी काही वावगे नाही. " ताई , शिळ काही असेल तर वाढ" असे ओरडणारे पोर त्याच बालपण काय म्हणत असेल. आपल्या पोटाचा प्रश्न सोडविण्यासाठी हे पोर दारोदारी भिक मागत फिरत असते आणि मिळालेली भिक आपल्या कुटुंबासह वाटून खातात. सूर्य डोक्यावर चढायला लागला कि ही पोरं उकिरडे शोधात फितात.मि...