Posts

Showing posts from April, 2018

बालमजुरी कधी संपेल

Image
                                                           बालमजुरी कधी संपेल               बालपण हि प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातील एक महत्वाचा टप्पा आहे. परंतु सर्वांचेच बालपण सुखात किंवा     मजेत जातात असे नाही. संत तुकाराम महारा यांनी बालपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा. असे म्हंटले आहे. पण समाजात वावरताना जे चित्र नजरेस पडते ते फारच भयानक आहे. सकाळी सूर्यकिरण धर्तीवर पडत ही नाही किं घराबाहेर एक चीराकणारा आवाज कानावर पडतो. त्या आवाजानेच जाग येते, म्हंटले तरी काही वावगे नाही. " ताई , शिळ काही असेल तर वाढ" असे ओरडणारे पोर त्याच बालपण काय म्हणत असेल. आपल्या पोटाचा प्रश्न सोडविण्यासाठी हे पोर दारोदारी भिक मागत फिरत असते आणि मिळालेली भिक आपल्या कुटुंबासह वाटून खातात.                सूर्य डोक्यावर चढायला लागला कि ही पोरं उकिरडे शोधात फितात.मि...

ग्रामीण दुष्काळ व शहरी झगमगाट

Image
                                           ग्रामीण दुष्काळ व शहरी झगमगाट           वर्षामागून वर्षे दुष्काळाची येत आहेत. कमी पावसामुळे निसर्गचक्राच बदलत आहे. विकसित देश भौतिक प्रगतीच्या पाठीमागे लागले आहेत. त्यामुळे पर्यावरणाचे किती नुकसान होत आहे याच्याशी त्यांना घेण - देन नाही.त्यामुळे ग्लोबल वार्मिंग व त्यामुळे निसर्गचक्र असंतुलीत झाले आहे. दुष्काळाचे दृष्ट चक्र सुरु झाले आहे. त्यात प्रामुख्याने ग्रामीन भाग जास्त प्रभावित झाला आहे.             सध्या आपण अनुभवतो आहोत पाण्याचा ज्वलंत व भीषण प्रश्न ! वर्तमानपत्रात रकानेच्या रकाने भरून गावागावाच्या आर्त कहाण्या व मन हेलाऊन सोडणारे फोटो. हंडाभर पाण्यासाठी बापड्यांना करावी लागणारी वनवन. टँँकराची  वाट पाहत बसाव कामधंदा सोडून.कारण आता  टँँकर येऊन गेला कि पुन्हा कधी येयील याचा भरवसा नाही.            गाईगुरे छावणीत आणि ...

समतेचे प्रणेते डॉ. बाबासाहेब आंबेडकर

Image
                                  समतेचे प्रणेते डॉ. बाबासाहेब आंबेडकर              जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारत देशात आपण राहतो याचा प्रत्येक भारतीयाला अभिमान नक्कीच असेल.आपल्या अतुल धाडसाने व भारत देशाचे स्वातंत्र्य या एकमेव ध्येयांनी प्रेरित झालेल्या असंख्य देशभक्तांनी स्वतंत्र लढ्याचा इतिहास घडवला आहे. अखेर त्यांची लढाऊ वृत्ती व वीरश्रीयुक्त बलिदान व्यर्थ न जाता १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वतंत्र मिळाले. भारत देश सार्वभौम झाला. आपल्या खंडप्राय देशाला नियमांची चौकात आखणे तसेच त्याचे घटनेत रुपांतर करणे हे जिकीरीचे व व्यापक काम त्यावेळेस क्रमप्राप्तच होते. एवढे मोठे काम हे एकट्याच्या आवाक्यातील नसल्याने भारत देशाची घटना बनविण्यासाठी एक समिती बनविण्यात आली.             त्या समितीत त्या काळातील नावाजलेल्या व्यक्तींचा अंतर्भाव होतो. कायद्याचा सखोल अभ्यास व कायद्यातील अत्युच्च पदवी असल्यामुळे साहजिकच डॉ. बाबासाहेब आं...

विकासदर सुधारला पण ....

Image
                                                 विकासदर सुधारला पण ....                 नुकत्याच संपलेल्या तिमाहीत  देशाचा विकास वेग   ७.२  टक्के असल्याचे जाहीर झाले. या दरामुळे सरकार आणि सरकारच्या समर्थकात  आनंद व्यक्त केला जात आहे. कारण गेल्या वर्षी हा विकास्वेग ५.७ टक्के एवढा कमी झाला होता.तेंव्हा सरकारवर  विरोधकांनी टीका करायला सुरुवात केली होती. हि टीका एवढी तीव्र होती कि, राहुल गांधी यांनी आता अर्थव्यवस्थेचा कडेलोट होणार असल्याने लोकांनी बांधून तयार राहावे असे आव्हान केले होते. विकास वेग कमी झाल्याने आता रोजगार कमी निर्माण होणार. आंनी तरुणांमधील बेकारी वाढत जाणार.असे म्हंटले जायला लागलेले होते. ज्यांना अर्थव्यवस्थेतील काही काळते आणि ज्यांना काही काळात नाही त्या सर्वांचेच आता रोजगार निर्मितीचे काय ? असा सवाल करायला सुरुवात केली होती.             ...

पुतळे आणि विचार

Image
                                                                                                        पुतळे आणि विचार                   त्रीपुरातल्या लोकांनी लेनिनवादी साम्यवादीपार्टीचा पराभव होताच तिथला लेनिनचा पुतळा पडून टाकला.या पाडकामामागे रशियातल्या काही घटनांचा संबंध आहे.रशियात १९८९ साली साम्यवादी राजवट संपली तेंव्हा लोकांनी केवळ लेनिनच नाहीतर अन्य काही साम्यवादी नेत्यांचे पुतळे पाडले होते. आता त्रिपुरात त्याचीच पुनरावृत्ती झाली आहे.असे पुतळे पडणे योग्य नाही आणि आपली ती परंपराही नाही. पण लेनिनने जो विचार सांगितला त्या विचाराने त्रीपुरातल्या गरीब लोकांचे प्रश्न सुटले नाहीत.म्हणून ते लेनिनचा पुतळा पडून आपला साम्यवादी विचारावरचा राग व्यक्त करीत होते.जगभरातच साम्यव...

मरणाचा अधिकार

Image
                                                       मरणाचा अधिकार                अनेक लोकांचे म्हातारपण फारच वेदानादाई असते. काही लोक या वयात असाध्य रोगांनी पछाडलेले आणि मरणप्राय वेदनांनी व्याकूळ झाले की देवाची प्रार्थना करतात. देवा यातून सोडव म्हणून याचना करायला लागतात. पण देवाला त्यांची दया येत नाही.अशा लोकांची देवाला दया येत नाही आणि त्यांची सेवा करणारे आप्त त्रासून जातात. देवाने त्यांची सुटका करावी अशी ते मागणी करायला लागतात. आता त्यांची प्रार्थना न्यायालयाने ऐकली आहे. ज्याचे जगणे असह्य झाले आहे त्याला या जगण्याच्या यातानातून मुक्त करण्यास सर्वोच्च न्यायालयाने सशर्त मान्यता दिली आहे. अर्थात न्यायालयाने याबाबत काही मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. आणि सरकारने यावर कायदा करावा अशी न्यायालयाची सूचना आहे. तो कायदा मार्गदर्शक सूचनांच्या अनुरोधाने तयार केला जाईल.           ...

अण्वस्त्रधारी आशिया

Image
                                            अण्वस्त्रधारी आशिया             दुसऱ्या  महायुद्धाची सुरुवात अखेर अणुबॉब ने झाली. १९४३ पासूनच जर्मनी असे काही तरी स्फोटक आणि महासंहारक अस्त्र शोधण्यात गर्क आहे..अशी कुणकुण दोन राष्ट्रांना लागली होती. तेंव्हा जर्मनीने ते अस्त्र शोधण्याच्या आत आपणच ते का शोधू नये असा विचार अमेरिकेने केला. अमेरिकेने अणुबॉम्ब तयार केला आणि त्याचा पहिला प्रायोग जपानवर केला.तो प्रयोग जर्मनीवर का केला नाही हे काही कळले नाही पण जगातला पहिला आणि आतापर्यंतचा शेवटचा अणुस्फोट जपानमध्ये म्हणजेच आशिया खंडात झाला . असे असले तरी अमेरिकेच्या पाठोपाठ अणुबॉम्ब तयार करण्यात ब्रिटन, फ्रांस,रशिया, जर्मनी, या युरोपीय देशांनीच आघाडी घेतली.१९६० च्या दशकापर्यंत तरी अणुबॉम्बधारी देश म्हंटल्यावर याच देशाची नवे समोर येत होती.आणि त्यात आशियातल्या कोणत्याही देशाचा समावेश नव्हता.            परंतु आताचे च...

लोकसंख्या, पर्यावरण आणि विकास

Image
लोकसंख्या, पर्यावरण आणि विकास  देशाच्या भावितव्याचा विचार केला तर आपल्या देशापुढे सध्या तीन प्रमुख आर्थिक समस्या आहेत. लोकसंख्या नियंत्रण, पर्यावरण राक्षनासह आर्थिक विकास आणि दारिद्र्य निवारण. त्यामध्ये लोकसंख्या वाढ हि समस्या आपल्याला काही नवीन नाही. आगदी १९४७ पासून आपल्या नेत्यांना याची कल्पना होतीच. वाढत्या लोकसंख्येचे नियंत्रण कसे करावे हे अनेक तज्ञांनी अनेक वेळा सांगितले आहे. आगदी २०११ मध्ये सुद्धा लोकसंख्या नियंत्रणाचा प्रश्न सुटला असे कोणीही आत्मविश्वासाने सांगत नाही.           १९७१ पासून २०११ या ४०  वर्षामध्ये लोकसंख्या वाढीचा वेग जरी प्रत्येक शिरानागतीमध्ये कमी कमी होत असला तरी लोकासंख्यामध्ये होणारी एकूण वाढ मात्र वाढती आहे. २००१ - २०११ मध्ये लोकासंखेमधील एकूण वाढ आधीच्या दहा  वर्षापेक्षा थोडी कमीच दिसते. हे स्वागतार्ह आहे. हेच कायम राहिल्यास २०२१ मध्ये लोकासंखेमधील एकूण वाढ आन्ख्की थोडीशी कमी झालेली असेल. अशी आशा करण्यास हरकत नाही. देशाच्या एकूण लोकसंख्येमध्ये सर्वात मोठा वाटा उत्तर परदेशाचा ( २० कोटी ) तर दुसरा क्रमांक म...

पर्यावरणाच्या समस्या आणि भविष्यातील धोके

Image
                                          पर्यावरणाच्या समस्या आणि भविष्यातील धोके               आपल्या पृथ्वीमातेला तिच्या लाडक्या बाळांच्या ( मानवाच्या ) नको त्या उद्यापने अनेक आरोग्यविषयक समस्यांनी ग्रासलेले आहे. जागतिक तापमानवाढ, आम्लयुक्त पाऊस, वायू प्रदूषण , नागरी अवस्था, कचरा समस्या, ओझोन वायूची घटती पातळी, जल प्रदूषण अशा एक ना अनेक  व्याधींनी पृथ्वीच्या आयुष्याला साडेसाती लावली आहे.मागील काही दशकापासून मानवाकडून चाललेला पृथ्वीच शोषण आणि वातावरणाची अवनती ने आता धोक्याची पटली ओलांडली आहे.आपली  स्वार्थी चंगळवादी कृष्णकृत्ये पृथ्वीच्या प्रकृती रक्षणाला अनुकुल  नसल्याने , पूर भूकंप,सुनामी, वादळे, यासारख्या नैसर्गिक आपदांना वारंवार आपल्याला तोंड द्यावे लागतं आहे.वेगवेगळे निसर्गमित्र व संस्था पृथ्वीच्या या दुर्दशेबद्दल जगभरात लोकांना अवगत व शिक्षित करण्याचा आपापल्या परीने परायात्न करत आहेत.         ...

पर्यावरण आणि मानवी जीवन

Image
पर्यावरण आणि मानवी जीवन            पृथ्वीवर सर्वात बुद्धिमान जर कोणी असेल तर तो म्हणजे मानव. त्यामुळे  त्याने आपल्या बुद्धीमतेचा वापर करूनं पर्यावारानाकडून जसा पाहिजे तसा आपला विकास साधवून घेतला. मात्र परतफेड करण्याचे साफ विसरला. एखाद्या व्यक्तीकडून  व समाजाकडून जेंव्हा आपण मदत घेतो तेंव्हा त्याच्या प्रती नेहमी कृतज्ञ राहतो, हा नियम पर्यावरणाशी मानवाने कधीही पाळला नाही. त्यामुळेच आज 'पर्यावरण वाचवा' यांसारखी वाक्ये कानी पडतात.सर्वप्रथम मी पर्यावरणाचा एक घटक आहे याचे भान प्रत्येकाने थावाने गरजेचे आहे.ज्याप्रकारे कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती  कुटुंबाचा एक घटक असल्याचे भान ठेऊन वागतो,त्यामुळेच  त्या कुटुंबात सुख, समृद्धी, आणि स्थिरता दिसून येते. कुटुंबातील एक जरी व्यक्ती बेजबाबदारपणे वागला तर संपूर्ण कुटुंबाला  त्याचे फल भोगावे लागते. पर्यावरणाचही  तसेच आहे.            पर्यावरणाचे माझ्यावर कर्ज आहे आणि ते मला फेडायचे आहे हे हि ध्यानात असू द्यावे.पर्यावरणाचा ऱ्हास होण्यामागे वाढती लोकसंख्या हे ह...

स्वातंत्र्याची ६८ वर्षे

Image
                                                     स्वातंत्र्याची ६८ वर्षे              भारतातला स्वातंत्र्य मिळून ६८ वर्षे झाली. स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेक क्रांतिकारी, स्वातंत्र्यवीरांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. स्वराज्य मिळविण्यासाठी टिळक, गांधी , प्स्तेल, सुभाषचंद्र बोस या महापुरुषांच्या नेतृत्वाखाली अनेक जन स्वातंत्र्याच्या लढाईत धारातीर्थी पडले.स्वराज्याचं स्वप्न अखेर १५  ऑगस्ट १९४७ साली सत्यात उतरल.स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्येला पंडित नेहरूंनी दिलेल्या भाषणात भारताने स्वातंत्र्यासाठी केलेला प्रवास उलगडला.आणि त्याचबरोबर भारताने आपल स्वातंत्र्य परत मिळवल्याच जगात सांगितल.भारताला सर्वात मोठे लोकशाही राष्ट्र म्हणून ओळखले जाते.               भारत ज्या वेगाने प्रगती करत आहे त्याच्या दुप्पट वेगाने समस्यांनी वेढलेला आहे. प्रश्न पडतो कि खरंच आपण स्वतंत्र आहोत क...

स्त्री शक्तीला सलाम

Image
                                                स्त्री शक्तीला सलाम                     भारतीय तत्वानुसार अस्तित्वाच्या त्रिकोणाच्या पायाच्या एका टोकाला पायाभूत सुविधा व समृद्धी देणारी लक्ष्मी व संरक्षण देणारी महाकाली दुर्गा या त्रिकोणाच्या शिरोबिंदुमध्ये ज्ञान कल्पना देणारा महा सरस्वती असते. अशा प्रकारे या तीन शक्तींना महाकाली , महालक्ष्मी, महासरस्वती असे स्थान आहे दिलेले आहे. पूजा जरी पुरुष देवताची होत असली तरी चर्चा होते ती त्यांच्या शक्तीची, त्यांच्यात असलेल्या स्त्री शक्तीची.              स्त्री आणि पुरुष यांच्यात केवळ शरीर भेद नाही तर स्त्री अधिक संवेदनशील श्रद्धावंत आहे. तिला देवत्वाचे अस्तित्व अधिक जाणवते.पुरुषांचे लक्ष्य मात्र भौतीकातेकडे जडत्वावर अधिकार गाजविण्याकडे अधिक असते.              राजा जनकाच्या राज्यसभेत यज्ञवलक्य...

चला परत लहान होऊयात

Image
                                            चला परत लहान होऊयात                                                    " !! लहानपण देगा देवा ,                                                       मुंगी साखरेचा रवा,                                                       ऐरावत रत्न थोर,                                                        ...

पर्यावरणाप्रती संवेदनशील बना

Image
पर्यावरणाप्रती संवेदनशील बना  ग्लोबल वॉर्मिंग मध्ये होणारी वाढ हा सध्याचा गंभीर प्रश्न आहे तो प्रत्येकाच्या जीवनाशी निगडीत असून त्याचे दुष्परिणाम सर्वांनाच भोगावे लागतं आहेत. स्वतःच्या  जीवनशैलीत काही छोटे- छोटे बदल करून ग्लोबल वॉर्मिंग कमी करण्यात प्रत्येकजण खारीचा वाट नक्कीच उचलू शकतो. आज आपल्या सर्वांनाच जगातील विविध खाद्यपदार्थाची चव चाखायला खूप आवडत. त्या संदर्भात प्रयोग करायलाही आवडत. परंतु राजगिरा सारखा सकस नैसर्गिक व जैविक खाद्यपदार्थ उपलब्ध असताना परदेशातून खाद्य पदार्थ आयात कारण अनावश्यक वाटत. कारण एक तरी ते अधिक खर्चिक असतात. आणि  दुसर म्हणजे त्यामुळ कार्बन उत्सर्जनात भर पडते.             नेहमी आयात अन्नधान्य ऐवजी स्थानिक पातळीवर तयार होणार्या खाद्य पदार्थांना प्राधान्य देतो.पण ते ताजे आणि दर्जेदार असायला हवेत.यातून स्थानिक शेतकरी आणि विक्रेते विशेषत: महिला विक्रेते सक्षम होतात असं मला वाटत. तुम्ही जेंव्हा बाजारात जल तेंव्हा भाज्या  आणि अन्य  सामानासाठी पिशवी घेऊन जा.हि पिशवी ओउन्हा पुन्हा वापरता यावी अशी...